“खर्डा येथील कानिफनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्यायाची मागणी.
खर्डा ग्रामस्थांचा ८ जानेवारीला रास्ता रोकोचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कानिफनाथ यात्रा मोठ्या उत्साहात होतो दरवर्षी लाखो भाविकांनी हजेरी लावतात.भाविकांना यात्रा काळात अडथळा ठरणारे कानिफनाथ देवस्थान यात्रा उत्सव परिसरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी खर्डा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदर अतिक्रमणे न काढल्यास ८ जानेवारी २०२६ रोजी शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय जागांवर अतिक्रमण:गट क्रमांक ९२०गट क्रमांक ११८६/२गट क्रमांक ११४१इतर शासकीय गटांवर अनधिकृत अतिक्रमणकाही व्यक्तींनी या शासकीय जागांवर अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले असून, यामुळे देवस्थानाच्या पवित्रतेला धक्का बसत आहे. यात्रा उत्सवाच्या काळात या अतिक्रमणांमुळे भाविकांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे.यात्रा उत्सवावर विपरीत परिणाम:
ग्रामस्थांच्या निवेदनात नमूद:वाहतूक कोंडी वाढते गर्दी नियोजन अशक्य होते भाविकांच्या सुरक्षिततेला धोका पवित्र वातावरण बिघडते स्थानिक व्यवसायांना फटका”श्री कानिफनाथ यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात.
अतिक्रमणामुळे व्यवस्थापन व सुरक्षितता धोक्यात येते. तात्काळ कारवाई अपेक्षित,” असे निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.प्रशासनाला
निवेदनाची प्रत पाठवण्यात आली:जिल्हाधिकारी, अहिल्यानगर उपविभागीय अधिकारी, कर्जतगट विकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड,खर्डा पोलीस स्टेशन ग्रामपंचायत (सरपंच) यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत शिर्डी-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.
“श्री कानिफनाथ देवस्थान ही आमची श्रद्धास्थान आहे. त्याच्या पवित्रतेसाठी आम्ही ठाम आहोत. प्रशासनाने वेळीच कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र होईल,” असे खर्डा ग्रामस्थ प्रतिनिधींनी सांगितले. या मागणीसाठी ग्रामस्थ एकजुटीने उभे असल्याचे दिसून येत आहे.श्री कानिफनाथ यात्रा ही जामखेड तालुक्यातील प्रमुख धार्मिक सोहळा असून, दरवर्षी देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. या पवित्रतेसाठी ग्रामस्थांची ही लढाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

