Homeव्हिडिओ बातम्यानेमकं अतिक्रमणं कुठय!... त्या ८-१० जणांनी महामार्गाच्या कामाला व गावाला वेठीस धरू...

नेमकं अतिक्रमणं कुठय!… त्या ८-१० जणांनी महामार्गाच्या कामाला व गावाला वेठीस धरू नये, अतिक्रमणाचा रंजक चित्र नको ; तो भाग वगळता इतरत्र धास्तीचे वातावरण करू नये

नेमकं अतिक्रमण कुठय!

त्या ८-१० जणांनी महामार्गाच्या कामाला, गावाला वेठीस धरू नये.

अतिक्रमणाचे रंजक चित्र नको; तो भाग वगळता इतरत्र धास्तीचे वातावरण करू नये

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील अतिक्रमण हा विषय जेवढा किचकटपणे चर्चिला जात आहे खरच तेवढा किचकट आहे का? कोणतेही अतिक्रमणे हटविण्यापुर्वी त्यात कोणी विस्थापित होत आहे का हे पाहिले पाहिजे. होत असेल तर त्यांच्या पुनर्वसनाचा विचार प्रथम व्हायला पाहिजे. मात्र आतापर्यंत जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतचे विशेष कोणीही विस्थापित झालेले दिसत नाहीत. राहिलेल्या कामामुळे ही कोणी विस्थापित होईल असे दिसत नाही.

रस्ता हा विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. जामखेड अनेक वर्षांपासून विकासाच्या रस्त्यावाचून मागे आहे. हा प्रलंबित असलेला विकासाचा रस्ता लवकर व्हावा अशी समस्त जामखेडकरांची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न झाले आहेत. होत आहेत. रस्त्याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र ठराविक ८-१० लोकांमुळेच शहरातील मोक्याच्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याचे काम थांबले आहे. नगररोडकडुन खर्डा चौकापर्यंत काम झाले आहे. तसेच बीड रोड कडून सरकारी दवाखान्यापर्यत काम झाले आहे. फक्त खर्डा चौक ते सरकारी दवाखाना म्हणजे अंदाजे १००-१५० मिटर इतकेच काम थांबले आहे.

म्हणजेच अतिक्रमणे फक्त याच १००-१५० मीटरमध्ये आहेत. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी दोन्ही बाजुला शासकीय जागा आहेत.उत्तर आणि दक्षिण भागात मिळुण ८-१० मालमत्ता धारक आहेत. बीड रोड कडुन ज्या पध्दतीने रस्ता काम आले आहे तसेच पुढे बीड काँर्नर ते खर्डा चौकापर्यंत रस्ता काम केले तर फारच थोड्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्याची गरज पडेल. मात्र सध्या संपूर्ण शहरात अतिक्रमण आहे. बीड रोड कडून मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे काम झाले आहे. बीड रोडला अतिक्रमण नाहीत तरी अवास्तव चर्चा व चित्र रंगवत आहेत. बीड रोडची अतिक्रमणे असा बोलतांना भर दिला जातोय. खरेतर मुळ अडथळा बीड रोड काँर्नरच्या त्या ८-१० मालमत्ताधारकांचेच अतिक्रमणच ठरत आहेत.


त्यांनी स्वतः समोर येऊन प्रशासनाला व नगरपरिषद लोकप्रतिनिधींना विश्वास देऊन सहकार्य मागितले पाहिजे. मात्र त्या ८-१० लोकांची अडेल मानसिकता संपूर्ण शहराची मानसिकता खराब करत आहे. आज उपोषण, आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ठेकेदार व संबंधित अधिकार्यांनी फारच संथ गती अवलंबिली आहे. हेही तितकेच जबाबदार आहेत.
सदर ठीकाणी बीड रोडच्या प्रमाणेच पुढेही काम केलं तर हवं तेवढेच काढले तर कोणीही विस्थापित होणार नाही तसेच मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे काम सुरळीत पार पडेल.मुख्य अडथळा ठरणारा तो भाग वगळता इतरत्र धास्तीचे वातावरण करू.


—————–

बघा विचार करा ;पायाला जखम डोक्याला मलम लावू नये – : सुनिल जगताप

——————-

नगरपरिषदेने गाळे पुर्ण करुन गाळे वाटप करावे मगच कार्यवाही करावी त्या पुनर्वसनाच्या अगोदर जर पूर्ण अतिक्रमण काढले तर जामखेड ओसाड होईल.

सध्या खर्डा चौक ते बीड कॉर्नर एवढाच भाग मूळ अडथळा ठरत आहे. तेवढाच १०० मीटर परिसरात वहातुक जाम असते.

जखम पायाला मलम डोक्याला् अशी परिस्थिती या ठेकेदार व प्रशासनाच्या कामात पाहायला मिळत आहे.जिथे मोकळ करायची गरज आहे तिथे न करता सरसकट बीड रोड वर भर देण्यात येत आहे.

बीड कॉर्नर ते खर्डा चौक एवढे मोकळे केल्यास 99% ट्रॅफिक प्रॉब्लेम मधून सुटका होऊ शकते.बघा जामखेड ओसाड करण्यापुर्वीच विचार करा कारण साधारण: १३ वर्षांपूर्वी असेच बीड रोडचे अतिक्रमण काढले होते. होते तसेच आजही बीड कॉर्नर ते खर्डा चौकापर्यंत आहे. ट्रॅफिक जाम आहेच.पण बीड रोडचे अतिक्रमण काढून किती कुटुंब उध्वस्त झाले हें पाहिले का कोणी ..??  काहींनी तर रोजगार गेला पर्यायी जागा नाही म्हणून वैफल्य ग्रस्त होऊन आत्महत्या केल्यात याची नोंद कोणी घेतली का?

म्हणूनच नगरपरिषदेने व सर्व प्रशासनाने फक्त अगोदर बीड कॉर्नर ते खर्डा चौक याच परिसरातले अतिक्रमण काढून अगोदर पर्याय उपलब्ध करून द्यावेत नंतरच बाकी गोष्टी कडे पाहावे.सरसकट अतिक्रमणे म्हणून पहाणे चुक ठरेल. व्यक्तिगत रोंष धरू नका. अकारण कोणाचेही अतिक्रमण काढुन कोणाची रोजी रोटी हिरावून घेऊ नका. उघड्यावर कोणाला पाडु नका.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!