Homeव्हिडिओ बातम्याजनगणनेतूनच जनकल्याण साधता येते :- नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, सौ प्रांजळ अमित चिंतामणी...

जनगणनेतूनच जनकल्याण साधता येते :- नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, सौ प्रांजळ अमित चिंतामणी यांनी पुर्ण केली स्व गणना, नागरिकांना केले आवाहन

जनगणनेतूनच ‘जनकल्याण’ साध्य करता येते – : नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

प्रांजल अमित चिंतामणी यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना

नागरिकांना केले आवाहन

जामखेड प्रतिनिधी
देशाच्या प्रगतीसाठी आणि नियोजित विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘जनगणना २०२७’ या राष्ट्रीय मोहिमेत जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजल अमित चिंतामणी यांनी स्वतः सहभागी होऊन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगराध्यक्षांनी अधिकृत पोर्टलवर आपली ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) प्रक्रिया पूर्ण केली असून, या उपक्रमाद्वारे त्यांनी जामखेडच्या नागरिकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. चिंतामणी यांनी स्पष्ट केले की, “जनगणनेतूनच ‘जनकल्याण’ साध्य करता येते. आपली माहिती अचूक नोंदवणे हे केवळ शासकीय कर्तव्य नसून ते एक सामाजिक उत्तरदायित्व आहे.

याच माहितीच्या आधारे भविष्यातील विकासकामे आणि योजना आखल्या जातात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन नगराध्यक्षांनी खले आहेत.

यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी यांनी शहराच्या जनगणनेच्या तयारीची माहिती दिली आणि जनगणना कार्याच्या अचूक आणि परिपूर्ण माहितीसाठी नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर आपल्या कुटुंबाची माहिती अचूक भरावी, स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारा ‘स्व-गणना आयडी’ (Self-Enumeration ID) काळजीपूर्वक जतन करून, जेव्हा शासननियुक्त प्रगणक आपल्या घरी माहिती पडताळणीसाठी येतील, तेव्हा त्यांना आपला हा ‘स्व-गणना आयडी’ त्वरित उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून जनगणना प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल अशी माहिती दिली.


जामखेड नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व नागरिकांना या राष्ट्रीय कार्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!