जामखेड प्रतिनिधी
परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शिल्पाची एका माथेफिरूने दि १० डिसेंबर रोजी तोडफोड करून निंदनीय कृत्य करत महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या जनतेचा अपमान केला त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला .पोलिसांनी निरपराध भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले.कोंबिग ऑपरेशन केले कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरूणाचा मृत्यू झाला.त्याला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारयांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबास २५ लाखाची मदत मिळावी,परभणी घटनेतील आरोपी वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा,खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस कडक शासन व्हावे अशी आरपीआयचे सुनील साळवे यांनी केली.सदर मागणीचे निवेदन तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आरपीआयचे वतीने निवेदन देण्यात आले.
सदर परभणी येथील घटनेचा आर.पी.आय. आठवले पक्षाच्या वतीने जामखेड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येवून निषेध नोंदविला.
यावेळी आर.पी आय.चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,शिवाजी साळवे,सतीश साळवे,सुनील सकट,रवी सदाफुले, ॲड.अक्षय साळवे,अंकुश गायकवाड,युवराज गायकवाड, रुकसाना पठाण, राम साळवे,महादेव महारनवर ,उत्कर्ष भालेराव,गौतम मोरे,सागर घायतडक,पोपट फुले,विनोद समुद्र,काशिनाथ सदाफुले,बापू जावळे,सागर चव्हाण,भीमा शिंदे,संदीप मोरे,रवी चौधरी,अभिजित साळवे,आदर्श साळवे,मिलिंद साळवे, छबू गायकवाड,सूर्यकांत सदाफुले,राजू साठे,सुभाष राजगुरू,अशोक साठे,विजय पुलावळे आदी बहुसंख्येने रीपाई कार्यकर्ते उपस्थित होते.